रविवार, १८ जानेवारी, २००९
मदन पाटील यांच्या "जिजाऊसाहेब" ह्या ऐतीहासिक कादंबरीची प्रस्तावना त्यांच्याच शब्दात.....त्रिवार मानाचा मुजरा .......
अन्नासाहेब चौधरी
संक्षिप्त परिचय :-विदर्भातील बुलढाना जिल्ह्यातील सिन्दखेड राजा येथे १२ जानेवारीला म्हालसा रानींच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला , लखुजी राजांच्या लाडक्या "जिउ" बालपणा पासूनच अनेक कला मध्ये निपुण होत्या।
"या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे" अंधार होत चाललायदिवा पाहीजेया देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे
॥जिजाऊ वंदनाजिजा माऊली गे तुला वंदितो मी,जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥तुझी सावली सर्व काळी असू दे,कुठे दुःख कोणास काही नसू दे;नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥ जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ
annasaheb choudhari
जिजाऊसाहेब"जिजाऊसाहेब
"जिजाऊसाहेब"जिजाऊसाहेब .....जगाच्या इतिहासतील एक महाशक्तिशाली स्त्री ....जिने जगाला दोन छत्रपती दिले ...स्वराज्य संकल्पक शाहाजीराजांच्या संकल्पाला प्रेरक ठरलेली..., नाउम्मेद ,निसत्व व मुर्दाड बनलेल्या मराठ्याना जागे करणारी एक विरमाता....राजमाता ...."जिजाऊसाहेब"जिने लहानपणापासूनच शिवबाला शौर्याचे ,धाड़साचे बाळकडू पाजले,संभाजीराजाना घड़विले, महाराष्ट्राचा सांभाल केला ....... !
अन्नासाहेब चौधरी
शनिवार, १७ जानेवारी, २००९
मराठे वीर दौडले सात ............
म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडलेम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सातते फ़िरता बाजुस डोळे.. किन्चित ओले..सरदार सहा सरसवुनी उठले शेलेरिकबित टाकले पाय.. झेलले भालेउसळित धुळिचे मेघ सात निमिषातआश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेनाअपमान् बुजविण्या सात अरपुनी मानाछावनित शिरले थेट भेट गनिमानाकोसळल्या उल्का जळत सात दर्यातखालुन आग, वर आग ,आग बाजुनीसमशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानीगर्दीत लोपले सात जीव ते मानीखग सात जळाले अभिमानी वणव्यातदगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचाओढ्यात तरन्गे अजुनि रन्ग रक्ताचाक्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचाअद्याप विराणी कुणी वारयावर गातम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात
होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्
आपन काही करु
आणि करनारच .....!
अन्नासाहेब चौधरी ...........